Wednesday, September 25, 2024

 

 


सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव 

           (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४) 

                

सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या देव काकांचा जन्म २१ मे १८९१ रोजी धार येथे झाला. त्यांनी विपुल लेखन केले पण दुर्दैवाने ते संग्रहित झाले नाही. ते इंदौर येथील महाराजा शिवाजीराव शाळा आणि मल्हार आश्रम मध्ये शिक्षक होते. 
 सी. का. देव यांचे मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश भाषेवर प्रभुत्व होते. सी . का. देव ह्यांनी ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध हिंदी अनुवाद १९६५ साली केला व चार वर्षांनंतर १९६९ मध्ये बाराव्या आणि अठराव्या अध्यायावर विवेचनात्मक लिखाण केले. त्यांचे शिक्षण इंदौरला झाले. इंदौरला ज्यावेळी महाराष्ट्र साहित्य सभा प्रारंभ झाली त्या वेळेपासून ते सदस्य होते. त्यांनी बरेच वर्ष साहित्य सभेत कार्य केले व सर्व पदांवर राहिले. त्यांचे नातू मिलिंद देव त्यांच्यासोबत पंधरा वर्षे होते. मिलिंद सांगतात की आजोबा खूप छान शिकवत असत. त्यांनी चारी भाषेत मंगलाष्टके लिहिली. अशा बहुगुणी कवीने बऱ्याच आणि  छोट्या छोट्या विषयांवर कविता लिहिल्या.

त्यांच्या पहिल्या पत्नी गुणाबाई १९२७ मध्ये वारल्या. त्यानंतर त्यांचे दुसरे लग्न झाले. दुसऱ्या पत्नी शकुंतलाबाईही १९४८ मध्ये वारल्या. या घटनांमुळे दुखावलेल्या सी. का. देव यांनी संशय कल्लोळ ही अतिशय दीर्घ कविता लिहिली. श्री देव यांनी कोजागिरी वर कविता लिहिल्या अभंगही लिहिले बोधामृत दिवाळी अंकासाठी त्यांनी श्लोक लिहिलेत. सी . का. देव हे तीन भाऊ होते. सन १९५७ मध्ये आपल्या कुटुम्बियांसोबत इंदौरला असताना  त्यांना विषम ज्वर  झाला होता. तेव्हाही त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या. झाशीच्या राणीचे वृंदावन त्याच वेळेस ही कविताही त्याच वेळेस लिहिली. सी . का. देव यांनी चंद्र गीते लिहिली त्याचप्रमाणे बालगीते लहान मुलांसाठी लिहिले पूर्वी स्वयंपाक घरात खलबत्त्याचा उपयोग होत असे त्यांनी नवा खलबत्ता आणल्यावर त्यावर कविता केली. 
इंदौरला ''अहिल्योत्सव'' दरवर्षी खूप थाटात साजरा केला जातो.  इंदूरकरांना महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. इतका की त्यांना देवी अहिल्या देखील म्हटले जाते. त्यांच्या आयुष्यातील ठळक प्रसंग लहानापासून मोठ्या पर्यंत अगदी सगळ्यांना मुखोद्गत आहे. महाराणी इंदिराबाई होळकर यांच्या मागणीवरून सी. का. देव यांनी ‘अहिल्या पूर्ण प्रताप’ यावर कविता लिहिली आहे.सी . का. देव यांनी विविध विषयांवर कविता लिहिल्या. तिचे गाऱ्हाणे ही कविता लिहिली व जय जय गांधी ही कविता गांधी दिनानिमित्त श्रद्धांजली म्हणून लिहिली.इंदौरला जेव्हा जेव्हा शास्त्री ब्रिज बनला त्यावेळी ही त्यांनी कविता केली. त्यांचे नातू मिलिंद देव ह्यांच्याकडे सी. का. देव यांच्या अनेक आठवणी आहेत. मिलिंद सांगतात की ते जेव्हा दोन वर्षाचे होते तेव्हा आजोबांनी झोपेचे गाणे लिहिले होते. ते गाणे मिलिंद यांना झोपवताना ते रोज म्हणत असत व आश्चर्य म्हणजे मिलिंद लगेच झोपत. 

साहित्यात चंद्राला उद्देशून किंवा त्याच्या माध्यमाने अनेक कवींनी कविता लिहिल्या आहेत. जसे प्रेम, आई, पाऊस हे सर्व सामान्य आणि जवळपास प्रत्येक लेखकाच्या गद्य/पद्य लिखाणात येतात तसेच चंद्र देखील त्यांना मोहवितो. कवीवर्य सी. का. देव देखील ह्याला अपवाद नव्हते. भगवद्गीता १०-२१ मध्ये श्रीकृष्ण म्हणतात "आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, दिव्यांमध्ये मी तेजस्वी सूर्य आहे, मरुतांमध्ये मी मारीसी आहे आणि ताऱ्यांमध्ये मी चंद्र आहे." तर अशा ह्या ''चंद्राच्या'' खोडकर स्वभावाला धरून लोण्याचा लाडू ही कविता लिहिली त्यामध्ये गोपी आणि कृष्णाच्या लीला आहेत. 

सी . का. देव धार, देवास, इंदौरलाच जास्त राहिले. सन १९३४ मध्ये ते त्यांचे मित्र महादेव रामशास्त्री फडणीस यांच्या बरोबर साई दर्शनासाठी गेले होते. त्याच वेळेस त्यांनी बऱ्याच रचना केल्या व गीते लिहिली. इंदूरला शिवाजी जयंती पूर्वी पासूनच साजरी केली जाते.त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता लिहिली. 

सी . का. देव यांनी पाळणा ही लिहिला होता . महाराणी इंदिराबाई होळकर इंदूर यांच्या मागणी प्रमाणे दत्ताचा पाळणा दत्त जयंती उत्सवात म्हणण्यासाठी रचला. त्याला गाण्यासाठी श्री भास्करराव चोपडकर यांना विनंती केली व ती त्यांनी मान्य केली. दत्त जयंतीचा उत्सव राजवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. तोच पाळणा भास्कर राव चोपडकर यांनी गायीला. पाळणा सर्वांना खूप आवडला. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. 

महाराष्ट्र साहित्य सभेच्या सन १९४९च्या  वार्षिक शारदोत्सवात विडंबन स्पर्धेसाठी स्व. भा.रा. तांबे यांनी त्यांच्या ‘रुद्रास आवाहन’ कविता निवडली होती. त्याप्रसंगी सी . का. देव यांनी  ‘उंदरास आवाहन’ हे  विडंबन केले. शारदोत्सवाचे अध्यक्ष ना . सी . फडके यांनी विडंबनाची फार प्रशंसा केली. असे उत्कृष्ट विडंबन महाराष्ट्रातही पहावया मिळाले नाही असे उद्गार त्यांनी काढले. ‘रुद्रास आवाहन’  या कवितेचे विडंबन करणे कठीण होते आणि  उंदरास आवाहन एकमेव विडंबन यावर्षीच्या स्पर्धेसाठी योग्य ठरले होते. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य सभे कडून श्री देव यांना आचार्य प्र . के. अत्रे यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले.सी . का. देव यांना बरेच पारितोषिक मिळाले, त्या पैकीच एक हे पारितोषिक होते. 

 सी. का. देव यांची सुप्रसिद्ध कविता ‘कोटी कोटी प्रणति तुझ्या चरण तळपदी /जय जय जय जय विजयी मायमराठी’ सन १९३५ मध्ये इंदौर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी लिहिली आणि ९ मार्च रोजी उद्घाटन सोहळ्यात सादर केली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक महाराष्ट्र साहित्य सभा,इंदौरच्या दरवर्षी होणाऱ्या शारदोत्सवात प्रथम ही कविता गायली जाते. इतकेच नाही तर इंदौरला हिंदू महासभेचे अधिवेशन होते तेव्हा 
स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र साहित्य सभेला भेट दिली त्यावेळी देखील हीच कविता गायली गेली होती. महाराष्ट्र साहित्य सभेत धार येथील इतिहास संशोधक गुरुवर्य काशिनाथ कृष्ण लेले व निबंध लेखक व टीकाकार बालकृष्ण पंतदेव या उभयतांच्या हस्ते सी. का. देव यांना मानपत्र दिले गेले त्याप्रसंगी हीच कविता म्हटली गेली. हा समारंभ २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाला होता. विशेष म्हणजे ही कविता आजही तितकीच लोकप्रिय आहे आणि अनेक समारंभात सुरुवातीला गायली जाते. ह्या गीताला ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर एक सविस्तर लेख स्थानिक बातमीपत्रांत छापून आला. 

१. गुडी 

(चाल-घनश्याम सुंदरा या भूपाळीसारखी)


गुडी आमची ध्वजा जरीची भगव्या झेंड्या सवे 
नवी तळपते, घेऊन येते, वर्ष सुखाचे नवे

कणखर ताठर स्तंभ वंश हा, मानव उभारुन उभा. 
उमेदीने बेगुमान बघतो धडक द्यावया नभा, 
जरी पितांबर जरीची चोळी गुडीच्या खांद्यावरी, 
पती पत्नीचे जणू स्वागत करिती नववर्षांचे घरी 

गाठी गोड लेवूनी कंठी गुडी सांगते पहा,
गोड बोलणे, गोड वागणे, मंत्र सुखाचा महा
आणिक कडुलिंबाची पाने गाठीच्या संगती 
सांगती संसारात असावे कडवे पण मनगटी. 

गोड सुखी अन कडवी दुःखे येतील जेव्हा घरी, 
पचवा त्यांना खंबीर खांबापरी. 
करा नीट संसार कीर्तीच्या वंशाची वरिबरी
झिजा राष्ट्रसेवेत जिण्याची सार्थकता ही खरी .

भजा ईश्वरा शुद्ध भक्तीने कर्तव्य नित करा, 
प्रभू कृपेने सोख्यमंगले चालू नी येतील घरा 
विश्वंभर ओतितो अखंडित करुणा भक्तावरी  
कलश पालथा पहा सुचवितो झळकून गुडीच्या शिरी 

जरी पितांबर जरीची चोळी गर्जती पवना सवे 
उंच उंच नेण्यास जीवना वर्ष येतसे नवे

भोपाळ २७-३-७१

२. झोपेचे गाणे 

गोड गोड झोप कशी उठून येते? 
बागेत बसते, कुंजात खेळते.--गोड गोड झोप--१
वेलीत निजते, कळीत खुलते-गोड गोड झोप---२
फुलात फुलते, भुंग्यांना भिते--गोड गोड झोप गोड गोड झोप---३
तारात नाचते, चंदू शी हसते.--गोड गोड झोप--४

बाळाच्या तोंडात नक्षत्रे उगली 
गालात उषेची लाली झळकली, 
चंद्राची कोर नखिं नखिं चमकली 
बघुनी झोप बाळा पाशी थबकली, 
हळूच बाळाच्या डोळ्यात लपते--गोड गोड झोप ---५

गोड गोड झोप कशी कुठून येते--?

३१ बजरंगपुरा देवास
९/४/१९६३

३. तू कोण 

तू कोण कुठला रे, आलास रे कशाला ?
उकले न गूढ अजून माझा कशास  झाला 

दिसते आता तयारी सोडून जावयाची, 
का व्यर्थ लाविले रे हूरहूर ही मनाला ?

अवचित भेटला तूं , चिरकाळ  राहिला तूं , 
जरि  जायचेच होते तरि गुंतला कशाला ?

झालास जीवनाचे सर्वस्व तूंच माझ्या, 
बंध रेशमाचे रे तोडिशी कशाला ?

राहिलास काय किंतू,विटलास कां अता तूं 
तू न मीही प्रिय का, वैराग्य मग कशाला ?

रे मौन तू असा कां ? जाणार निश्चयें का ?
जाशील? जा सुखाने वाटेल त्या क्षणाला. 

पण जा हळूहळू रे, गुपचूप जा असा की, 
चाहूल पाउलांची लागोच ना कुणाला ?

आलास तेधवां तू कळूंना दिलेस काही, 
जाशील तेधवां रे जाणीव ती कशाला? 

पण पेरलीस ममता स्मर तीच प्राणनाथा, 
ने संगती मला रे, जेथून तुंही आलास. 

त्या नंदनांत राहू, आनंद नित्य लाहू 
रे व्यर्थ येरझाऱ्या शून्यांत त्या कशाला ?

इंदूर----८/१२/५३

४. वृंदावन 

ज्याला तेतीस कोटी देव स्तविती 
हस्तांजली जोडूनी, 
तो स्वर्गेन्द्र बघुनी विक्रम जिचा 
संतुष्ट झाला मनी, 

त्याने वाहिली मंजिरी तुळशीची 
जी आदरे तेथून 
झाशीच्या रणदेवतेचे विलसते 
ते हेच रुंदावन 

देवास---२६/४/१९६५

५. बालगीत----लाल सूर्य 

लाल सूर्य 
पद ---यमन, त्रिताल 

हा लाल सूर्य किती गोल गोल! 
का झुकला गेला काय तोल? 

पतंग हा कुणि अहा! उडविला, 
सोन्याची कशी झालर याला.
 ऐट, किती किति डाम डौल!-----हा लाल सूर्य----

ओढती दोरे पर्वत सारे 
उडती पांखरें नाचती पोरे 
पण हा जातो खोल खोल.-----हा लाल सूर्य 

६. श्री अहिल्या पुण्यप्रताप 

(पद ----मांड--केरवा. 

चाल---संशय कल्लोळ नाटकातील तनु विक्रेय पाप महान या पदाची.) 


सती पुण्य प्रताप महान, वानाया शिणली वाणी,


संसाराची सतीच्या तेव्हा विधी करी धूळ धाणी 

तेव्हा बनूनी विश्व कुटुंबीनी विधीला टोला हाणी ।

स्वर्गीची सूर गंगा भागीरथ जरी हिमालयी  आणि, 

तुझ्या तपाच्या कावडीविण का ती रामेश्वर न्हाणी!


निर्मि अन्नजल विश्वंभर परी जीव फिरती दिन वाणी, 

त्यांना विजयी दाणा घाली तुझ्याच पाणी! 


धारातीर्थी असीधारा व्रत केले शिव बाजीनी

तुझ्या वाहती सुकृता धारातीर्था तीर्थामधूनी!


स्वधर्म मंदिर रचिता खपले धीरवीर अभिमानी 

तुझी मंदिरे रंभादीकती परमार्थांचा ठाणी


वैराग यांनी पोरुष करणे ऐसे बिद्र लिहूनी 

ऐश्वर्याची पुण्य पताका गेली स्वर्गी घेऊन 


अशी गुणांची राणी म्हणून विश्व तिला वर वाणी 

होळकरांची राणी अहिल्या भारत भूषण शिरोमणी 


इंदूर---१९३३


७. दत्त गुरुचा पाळणा 

राग--सारंग--ताल-धुमाळी 


अभि नंदना हरी 

झुलाविते अनुसूया नीज करी, 


जो, जो, गाई तरी रे बाळा 

पुरे सत्व बघण्याचा चाळा, 

अंगाई चा तुझ्या सोहळा 

बघू दे डोळे भरी.-----झुलविते----


निज तुरे पण मज जागु दे 

तुझ्या स्वरूपी मन लागू दे 

दत्त दत्त भजनी रंगू दे, 

माझी ही वैखरी---झुलविते 


विविध रूप नटला दत्ता तू 

परि मज माझा बाळ एक तू, 

तुझ्यात मुरले अवघे मी तू, 

वेगळीक वरि वरी-----झुलविते 


जगद्गुरु जग उद्धरण्याला,

माझा तान्हा बालक झाला, 

कृपेस सदया पार न उरला 

मी भाग्याची खरी-----झुलविते 


सार सुखाच्या सर्वस्वांचे 

अंकी खेळे बाळ गुणाचे, 

कशास निर्गुण निरंजनांचे 

पूजन करू मी तरी-----झुलविते 


इंदूर------२०/१२/१९३४/


८. जय छत्रपती शिवराया!

(चाल--भारत भाग्य विधाता--तीन चरणापर्यंत. पुढे बदलून)


जय जय, भारत क्षत्रिय भूषण छत्रपती शिवराया!


प्रताप रवी सम विक्रम धुति तवनाशी दास्य तमाशी,

स्वतंत्रे महाराष्ट्र नटवी, दिपवि हिंद प्रकाशी

लागे जग यश गाथा

जय है, जय हे, जय हे प्रताप रवी शिवराया!


स्वधर्म-संस्कृती-झळक खलांची वाहुनी पदतली मुंडी, 

प्रसन्न केली देवी भवानी तोषविली रणचंडी, 

सार्थक केली काया, 

जय हे, जय हे,जय हे रणधीरा शिवराया! 


गो ब्राह्मण प्रतिपालन रक्षण देश धर्म संस्कृतीचे, 

असिधारा व्रत हेच दिव्य तू आचारीले शस्त्रांचे 

निरसुनी विमोह माया. 

जय हे, जय हे ,जय हे धर्मवीर शिवराया 


स्वराज्य सिद्धीस पेटविले तू आत्म यज्ञाचे 

त्या होमाने पुनीत केले नाम महाराष्ट्राचे 

तो नित्य नमितो पाया. 

जय हे, जय हे, जय हे त्यागेन्द्रा शिवराया 


शक्ती-युक्ती-संच्चरित-भक्ती युक्त असतो भारत नृपती,

आदर्शीचे हा  तू निज चरिते ठेवीशी जगता पुढती 

लागती रिपू ही स्तवाया. 

जय हे , जय हे, जय हे राजेश्वर शिवराया! 


आपद्समयी राष्ट्र जनांच्या स्वातंत्र्याच्या समरी, 

नाम तुझे भारत तनया नव संजीवन वितरी, 

तुझं सम सत्सुत व्हाया. 

जय हे, जय है. जय हे स्फूर्ती देव शिवराया!


२०/२/३४ 


९ . उंदरास आव्हान 

(चाल--रुद्रास आवाहन या पद्याची)


दु डु दु डु दौड ये, अन खणित बीऴ ये. 

धूळ फुंकीत ये, येई उंदरा 

चौरजण गौरवा करीत 

कुरु कुरु रवा 


कडकडा फोड हा भुई भुंग्यांचा थवा,

बडबडवी गाडगी, उधळ कोंडा रवा 

फस्त करी धान्य , फळ, लाडू, मेवा, खवा, 

फस्त करी पापड वडे क्षुब्ध उंदरा. 


पाड उतरंड ही घालती पालथी, 

काढ शिंक्यावरून बरणी ती खालती, 

चरे चरुणी दे, नरटी आम्हा मती, 

आणि झटपट घरा ह्या दरीद्रा 


चाव चौताळणी कोठीच्या रक्षका 

बसती त्यांच्या मुखी उडव त्या भक्षिका, 

रक्तबंबाळ कर कुतरुनी पद नखा 

उंच मळू दे तुझ्या सुख समुद्रा 


तव तडाखा पडे, घर बुडे, धनी रडे 

शांती ही मालकीण बापुडी चडफडे

भरभरा मांडी मग पिंजरे चहुकडे, 

अग्नी मधी उजळण्या तू जरी धडा 


पूर्वी फासातुनी सिंह तू काढिले 

दृष्ट जनी ज्यांस जाळ्यात अडकविले 

वक्रतुंडा तुवा पाठीवरी मिरविले 

रे नमावे तुला वीरभद्रा 


इंदूर----३१/१०/१९४९ 


मूळ कविता -- रुद्रास आवाहन

(भा. रा. तांबे)

  

डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,

शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।

प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा

क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।


कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,

खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,

मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका

खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।


पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,

ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,

मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,

झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।


जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे

'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !

धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,

धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।


पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले

दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,

बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले

दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।


१० . लोण्याचे लाडू 

      (दिंडी छंद) 


सोंगाड्यांशी खेळले बालकृष्ण, 

दमुनी पडला सर्वास एक प्रश्न ,

आता उठूनी काय अहो खावे, 

कुणा गोपिला जाऊनी लुटावे. 


हरी बोले कां जाहलात कष्टी, 

सर्व गोपींची मडकी असती उष्टी, 

घरी माझ्या मागील अंगणात, 

जमा सारे गपचिप रहा शांत. 


दूभतू व त्यांची भांडी जिथे होती, 

तेथे चोरूनी बाळ सर्व जाती, 

माठ लोण्याचे तिथून लांबविले, 

आड गोठ्यांच्या दडूनी ठेवियेले. 


करुनी लोण्याचे शानदार लाडू 

कृष्ण लागे सर्वात खूप वाढू, 

माठ सारे झाडूनी रिते केले 

मध्ये ठेवियले गोल लाडू 


लागता ही चाहूल चोरट्यांची 

वळूनी तिकडे पाऊले यशोदेची 

चोर सारे ते धूम पळून गेले, 

लाडू लोण्याचे नभी झोकियेले


गोल गोळे ते उंच उडून गेले 

कृष्णस्पर्शाने तेज त्यास आले 

लोणी सारे ते फोडूणी या 

अभ्र बने तारे अन शारदीय



११ . माय मराठी 

(चाल —-  बहु असोत सुंदर…)


कोटी कोटी प्रणती तुझ्या चरण तळवटी 

जय, जय, जय विजये! माय मराठी (धृ )


पुत्र तुझे आम्ही, नित सेवणें तुला, 

दिग्विजया न च तुझिया साजते तुला; 

मान हिंदु राष्ट्राचा तूच राखीला 

धर्म हिंदु देशाच्या तूच जगविला; 

दास्य -दैन्य-दुर्गतिची तोडिली मिठी … जय जय 


वैराग्या पुरुषार्था शिकवि घरिं घरीं 

ज्ञानेश्वर निर्मि तुझिच ज्ञान निर्झरी 

शक्ति, युक्ति, भुक्ति, मुक्ति  बोधुनी खरी

दास ही करी समर्थ बोध बहुपरी 

मदन रतिस डुलवी झुलवी लावणी नटी … जय जय 



बोल तुझे मोलाचे रोकडे खडे, 

मद पंडित वीरांचा ऐकतो झडे 

घुमती तुझे पोवाडे  जंव चहुकडे 

तख्त तुझ्या छडकांचे तोच गडबडे 

हर! हर ही गर्जना काळ दळ पिटी … जय जय 



सरळ शुद्ध भावांची  सुरस मोहिनी 

पाप ताप हरति जिला नित्य परिसुनी, 

ती अभंग वाणि गोड अमृताहुनी 

कां न तिला मोहावा रुक्मिणी -धनी? 

ऐकण्यास सतत उभा भीवरे तटी… जय जय 



जोंवरि ही धरणि, चंद्रसूर्य जोंवरि 

जोंवरि सत्पुत्र  तुझे वसती भूवरी, 

रक्षितील वैभव शिर घेऊनी करीं 

दुमदुमेल दाही दिशीं हीच वैखरी--

धन्य महाराष्ट्र, धन्य धन्य मराठी… जय जय 


संकलन : प्रतिमा टोकेकर 



Sunday, July 7, 2024

प्रतिभा काळेले




 प्रतिभा काळेले

(१० मार्च १९१२ —१० मार्च १९९८)

प्रतिभा काळेले ह्या मागील शतकातील एक दर्जेदार कवयित्री होत्या. मूळ ग्वाल्हेरच्या प्रतिभाताई लग्नानंतर इंदौरला आल्या. त्या मराठी साहित्य विशारद होत्या आणि औपचारिक शिक्षण इंटरमीडिएट म्हणजे वर्तमानकाळातील बारावी पर्यन्त झाले होते. राजकवी रा. अ. काळेले हे त्यांचे पती होते, त्यामुळे त्यांना घरातच साहित्यिक वातावरण मिळाले आणि त्यांची ‘’प्रतिभा’’ फुलून आली.  त्या पूर्ण वेळ गृहिणी होत्या पण साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय सक्रीय होत्या.
पती राजकवी रा. अ. काळेले यांच्या फिरतीच्या नोकरीमुळे प्रतिभाताई मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. त्यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे  जेव्हा जेव्हा जिथे जिथे होत्या,  त्यांनी त्या त्या गावाचे नाव आणि सन कवितेखाली लिहिला आहे. त्याने कवितेचा संदर्भ कळायला सोपे जाते. उदाहरणार्थ ''लाल जांभळे निळे निळे ढग'' ह्या कवितेखाली त्यांनी बडवानी लिहिले आहे . ज्यांना बडवानी कुठे आहे आणि त्याच्या अवती भवती काय काय आहे ते माहित असल्यास कविता वाचली की संदर्भ चटकन डोळ्यापुढे येतात आणि कवितेचा आस्वाद द्विगुणित होतो.

प्रतिभाताईंने जवळ जवळ चार दशक  महाराष्ट्र साहित्य सभा इंदौरच्या कार्यकारी मंडळामध्ये उपाध्यक्षा, सहचिटणीस,साहित्य परीक्षा केंद्राधिकारी, संयोजिका, वर्ग अध्यापन, बालवाचनालय प्रमुख अशा अनेक भूमिका  यशस्वी रीत्या सांभाळल्या. महाराष्ट्र साहित्य सभेच्या दरवर्षी होणाऱ्या शारदोत्सवात  अनेकदा चिटणीस ह्या पदावर काम केले आणि  सुवर्णमहोत्सवी शारदोत्सवात संचालिका व स्मरणिकेचे संपादनही त्यांच्या हस्ते झाले.

प्रतिभाताईंने साहित्यिक क्षेत्रात भरपूर काम करत असतानाच सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स, इंदूर सचिव , मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलन, महिला संमेलनाच्या  अध्यक्षा - तसेच इंदूर विविध महिला संस्थात पदाधिकारी - महिला उद्योग मंदीराच्या निदेशकांपैकी  एक, सरस्वती शिक्षण सेवा संघ कार्यकारी मंडळ - श्री समर्थ मठ पंतवैद्य कॉलोनी ट्रस्टी असे विविधांगी कार्य संपन्न केलेत.

प्रतिभाताई यांचे साहित्य स्त्री,युगवाणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका,मालविका, सुषमा, जीवन विकास, मनोहर, वाङ्ग्मय शोभा,संवादिनी  इ. विविध मासिकांत प्रसिद्द झाले होते पण पुस्तक मात्र एकच प्रसिद्ध झाले आहे. "मन पाखरू पाखरू’’ प्रतिभाताईंची कधीच विझले आहे  ही कविता अतिशय गाजलेली कविता आहे. त्यांचे सादरीकरण देखील अत्यंत सशक्त असायचे. विशेष म्हणजे ही कविता दुःखाची चरम सीमा असूनही त्यांच्या कडून परत परत ऐकायला आवडत असे आणि कवी संमेलनात फर्माइश होत असे. 

प्रतिभाताईंच्या  "मन पाखरू पाखरू" या एकमेव पुस्तकात  त्यांची नात, कविता अरुण पारनंदीवार लिहिते 
''८४ वर्षे उलटलेल्या माईच्या व्यक्तिमत्त्वाच्या सीमारेषा आता धूसर होत चालल्या आहेत परंतु एकेकाळची माई ही फार विलक्षण व्यक्ती होती. तिच्या आयुष्याच्या प्रवासाची गडद छाप प्रस्तुत कवितांवर आढळते. स्वभावातील ममतेमुळे आयुष्यातील भावनिक गुंतवणूक व जीवनातील संकटांना  झेलणारा स्वाभाविक कणखरपणा असे अजब रसायन असलेल्या माईच्या कविता या पुष्कळशा आत्मकेंद्रित असल्या तरी अनुभूतींचे शब्दांकन इतक्या सशक्तपणे झाले आहे की त्यातून माईला समजणे फारसे अवघड नाही.कविता अरुण पारनंदीवार पुढे लिहितात की जीवनाचा नकारात्मक प्रतिसाद हा प्रत्येकाला अनुभवावा लागतोच परंतु त्यातूनही स्वतःचा डौल सांभाळल्याने दुःख सोसून येणारी असहायता न जाणवता नैसर्गिक क्रमाने येणारी अपरिहार्यताच माईच्या कवितांमधून जाणवते.तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक महत्त्वाची छटा मात्र इथे लुप्त आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मण स्त्रीमध्ये क्वचितच आढळणारे असे तिचे आधुनिक व प्रगतिशील मन मात्र या संग्रहात दिसत नाही.तर्कशास्त्राला सुसंगत अशी वैचारिक बैठक असलेल्या बुद्धिमान स्त्रीच्या केवळ भावनिक उलाढालींनाच शब्द रूप दिलेले दिसते अर्थात माईच्या विचारांची आधुनिकता व्यवहारात आणताना कर्तव्य आणि निष्ठांची मर्यादा पडलेली होतीच त्यामुळे प्राप्त आयुष्यातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडतानाच बुद्धीचा कस पणाला लागत असे. तरीही विद्याव्यासंग आणि 'अक्षर' भक्ती या दोन आसक्तींनी भारावल्याने तिचे आयुष्य तेजस्वी झाले आहे.सर्वसामान्य आयुष्यातील उणीवा आणि वेडी वाकडी वळणे तिच्याही वाट्याला आली. तरीही वरकरणी संसार गाडा चालवताना तिच्या मनाचा व बुद्धीचा चाललेला प्रवास तिला एक झळाळी देऊन गेला.कै. बाबूजींची साथ, प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्याने तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले. 
माईचा कवितासंग्रह हा अपूर्ण आहे असं जाणवतं. कदाचित आत्मचरित्र किंवा तत्सम काही लिखाण तिच्या जीवन प्रवासाला अधिक न्याय देऊ शकेल. ''



१. पिंगट भुरक्या माळमनावर 

पिंगट भुरक्या माळमनावर 
आकाशाचे तरुण मनोरथ 
वाऱ्याच्या भरकटल्या इच्छा 
घुटमळती गुलमोहराभवती 

वळणावळणाच्या वाटेची 
नागीण पडली कुरळी काळी 
इथे फरारी पडता पाऊल 
इश्काचा रुतवाया कांटा 

स्थितप्रज्ञ ही उभी टेकडी 
पोखरती जरी दुःखे आतून 
गवताचा वा हर्ष फुटेवर 
हिची न भंगे निळी समाधी 

सरोवराचा कांच बिलोरी 
त्यांत बिंबले मुख कमळाचे 
परंतु त्यांतच डोकवतांना 
तडा पडे या चित्तालागी

देवास १२/११/५५

२. लाल जांभळे निळे निळे ढग

लाल जांभळे निळे निळे ढग
हळूं हळूं वाहे वारा 
डोळे मिचकाऊन पाहतो 
मिष्किलसा सायंतारा 

कसा उसासे  ऊसमळा हा
मधें गव्हाचे शेत खुलें 
बाजुस कुंपण बोर बाभळी 
कडूनिंबाचा पिच्छु डुले 

या दरडेहून त्या दरडेवर 
मुरूममाळ हा फैलावे 
तीरकामटा घेऊनि त्यावर
भिल्ल उभा भोळ्याभावे 

करवंदीची झुडपें कोठें
पळसही कोठें हे उघडे 
आकाशावर लावुन दृष्टी
मध्येच अंजनखोड खडे 

खान्देशाशी खांदा जुळवुन
खुषित ठाकला नेमाड 
मालवराणी म्हणूनि लाजुनी
सरली का नजरेआड ?

सातपुडा हा इकडे तिकडे
विंध्य काढतो वर डोई 
इकडे खळखळ अवखळ रेवा 
तिकडे गदगद करी गोई 

हळूच "बावनगजा" उंचुनी
पहातसे हो काय तरी ?
"बडवानीला" कुशीत घेऊनी 
लाडाने बसलीच दरी 

या दृश्याची प्रसन्न जादू
मन चित्ताचा घे ठाव 
काय नवल मग बघतां बघतां
जर नूरले कल्मषभाव ?

-----बडवानी २५/०३/५४

*ऊसमळा /ऊसाचे शेत
दरड/चट्टान
नुरले/संपले
पिच्छू/झुबका, मोठ्या प्रमाणात एकत्रित पानं
गोई/ नर्मदेला मिळणारी एक उपनदी आहे.

३. संध्याकाळी

उगाच किरकिरत्या संध्याकाळी 
उदास खिडकी पहात बसते 
टेकडीच्या हिरव्या शून्याकडे 
धुळकट लाल वाटेच्या तिकडे 

जिकडे झेप एका पक्षाची 
ढगाळ पंगतीत 
पिंगट अबोध संगतीत 
आणि देवळाचा 
पांढुरका भुरका घंटानाद 
येऊन हळूच मिटतो 
माझ्या खिडकीत 
किरकिरत्या संध्याकाळी 

— इंदूर ०७/१२/६८


४. विसरतात दिशा जेव्हा

विसरतात दिशा जेव्हा 
आणि हरवतो प्रकाश 
आकाश जाते पुसून 
वारा बसतो रुसून 
आणि घुमुटांत पारवा घुसतो 
छातीत चोंच खुपसून 

तेव्हां न कळलेल्या खोल
आत ठुसठुसतो दर्द काही 
आणि 
आठवणींची भटकलेली पाखरं 
भिरभिरतात पालथ्या आकाशाखाली

इंदूर ३१/०३/६९

५.  येवढेच उरले हाती

काळजाच्या कोठडीत 
कैद केलेली वेदना 
अचानक उभी राहते 
माझ्यासमोर 
डूख धरल्या नागिणीसारखी 
फणा काढून फुत्कारत 
विचारते मला 
सुखदुःखाचा लेखाजोखा 

मग मीच होते पुंगी गारुड्याची 
झुलवत खुलवत सांगते तिला 
बाई ग! जीवन हा एक भोग आहे 
स्वप्नांची झुंबरं डोळी बांधून 
कठोर काजळी रात्रीच्या कुशीत 
झोकून द्यावे स्वतःला 
चघळावे दुःख आणि खंती 
इथं कोण कोणाचे ?
आपणच आपले साथी 

आता ढळत्या सांजवेळी 
अंधाराचा धरावा घट्ट हात 
मोकाट तोडावे बंध 
फक्त येवढेच आतां हाती  
येवढेच उरले हाती

— इंदूर ०६/०१/७३

६. कधीच विझले आहे 

धगधगून 
कधी पेटलेच नाही 
रसरसून
कधी अंगारलेच नाही 
झडपून देखील
कधी 
तडतडलेच नाही 

ठिणगी होऊन 
कोळपून कोळपून 
विझतच राहिले 
कोळशासारखी 
घातली नव्हती फुंकरच कुणी 
चेतावे म्हणून 

आता तर 
चितेवर सुद्धा 
मी फुलणार नाही 
कारण? 
कारण मी कधीच विझले आहे. 

इंदूर १८/०२/७३

७. वेदनेला हवा शब्द

वेदनेला हवा शब्द 
पण ओठांचे कवाड बंद 
अनुत्तराचे अत्तर फवारते 
निःश्वासातून मंद 

असूनही सर्वात 
नसतेच मी कुणात 
फक्त असते कुरवाळीत 
जखम माझीच जी 

सांगते आपले नाते 
अश्वत्थामाच्या जखमेशी. 

—  इंदूर ०७/११/७३

८. एकटी

तिच्या दिवस उजाडण्याचे कारण? 
सूर्योदय 
अन् सूर्यास्तातूनच होते तिची रात्र 
खूपच खंगली, दमली अन् झाली 
गलित गात्र 
ती कधीच जगली नाही 
स्वतःसाठी 
तिने पैकाही जोडला नाही गाठी 
आणि आता? 
आता संपत आलाय अध्याय 
तिच्या जीवनाचा 
फैसला होणारे तिच्या 
पापपुण्याचा 

अशी हो कशी ? 
ही अधांतरी लोंबकळत राहिली 
अंधाऱ्या बोगद्यातून गाडी जावी तशी 
नी टोकाला ती एकटीच उभी 
एकटी एकटी अगदीच एकटी 

टोक ? 
अहो टोक तरी कसलं ? 
अंधार कोंदट अंधार 
बद्धता अंधार 
अंधार अंधार अंधार 
एका अंधार बोगद्यातून 
दुसऱ्या अंधार टोकाशी 
अजूनही उभी आहे ती तशीच 
एकटी एकटी एकटी. 

इंदूर २९/०१/४७

९. तयार आहे मी ही

महाभयंकर आव्हाने 
स्वीकारली आजवर 
कधीच पाठमोरी फिरले नाही 
अशी सोसली तुफाने 
अशी प्याले वादळे 
पण कधीच भ्याले नाही 

अहो! जळता वडवानळ 
झेलून अंगावर 
त्याचाही वार चुकवलाय मी 
कातळ काळज्यांचा 
प्रचंड पर्वत 
फुलासारखा झेलून सारलाय मी 

मग धडधडत्या मेघांचा 
लवलवत्या विजांचा 
गारठल्या गारांचा 
कोसळत्या सरींचा 
कशाला रे!
धाक दाखवतोस मला ? 
अजून पाय रोवून घट्ट उभी मी 
आठवणींचा ठेवा झाकून पदराखाली 

थांब, क्षणभर थांब! 
आलाच असशील जर
मूळ घेऊन उपटायला मला 
तर मग मीही तयार आहे 
समर्पणाच्या महायात्रेला. 

(ह्या कवितेत तारीख नाही)

१०. वादळ

कुणीतरी गुंफियल्या 
चार कवितेच्या ओळी 
आणि माझ्या डोळियांना
आले घळघळ पाणी ।।१।। 

कुणीतरी आलापिले
गीत सुंदर सुस्वर 
आणि माझ्या हृदयी हो
उठे वादळ गंभीर ।।२।।

कुणीतरी हाकारिले मला
वाटे तुझी साद 
भलतेच होते कुणी
मनोमनी होई खेद ।।३।। 

कुठेतरी मोगऱ्याचा येई
गंध मंद मंद 
तुझ्या आठवाने न्हाले
चिंब माझे अंग अंग।।४।। 

आता नाही भेट पुन्हा
भेट थेट देवाघरी 
ठावे आहे मला परी
वाट पहाते मी दारी।।५।। 

कसे धावू मनामागे
मन पांखरू पांखरू 
येई धरता न हाती
कसे तयाला आवरू।।६।। 

कुठे जाऊ करू काय
वेडेपिसे झाले मन 
भेटीसाठी उतावीळ
कसे समजावू पण।।७।। 

—  इंदूर १५/१२/८२

११. विझू विझू वात मी

विझू विझू वात मी  
विझू द्या मला 
नका वात सारू आता 
सरू द्या मला 

विझू विझू माझ्यावर 
नका स्नेह ओतू 
विझण्याची भीति आता 
नका देऊ वाटू 

विझू विझू माझ्यावर
काजळीचा थर 
थिटे वाटू लागे मला 
माझे देवघर 

जेवढा शक्य झाला 
तेवढा दिला प्रकाश  
निळे खुले मुक्त मला 
पाहू द्या आकाश 

विझू वात म्हणे 
आता चांदण्यांशी खेळू 
चंद्र सूर्य दोन्ही
हाती पेलुनिया झेलू 

विझू वात म्हणे सीमा
समईची सोडू 
दिव्य प्रकाशाशी आता 
नवे नाते जोडू

— इंदूर २४/०४/८३

संकलन : अलकनंदा साने 

Monday, July 1, 2024

वसंत गोविंद नाखरे







                                                           वसंत गोविंद नाखरे

                                                    (२३ डिसेंबर १९३०- ३ मार्च १९७३)


               (कै. वसंत नाखरे यांची संपूर्ण माहिती आणि साहित्य हिन्दीत आहे. ते तसेच इथे देणार आहे.)
 
वसंत नाखरे का जन्म सागर म.प्र.में हुआ था.इंटर तक ही शिक्षा हुई थी कि एक दिन सांप्रदायिक दंगों को रोकने के प्रयास में पिता ने अपनी जान गँवाई, अतः परिस्थितीवश बैंक में नौकरी प्रारंभ की।  बालाघाट में बृजबिहारी तिवारी, सुरेन्द्रनाथ खरे का सानिध्य  मिला।  मुंबई आने के बाद पं. नरेंद्र शर्मा का साथ मिला जिससे काव्य - लता पनप सकी। मुंबई राज्य द्वारा आयोजित १८५७  शताब्दी - समारोह के अवसर पर  उनकी कविता"बंधन मुक्त करेगें माँ को" को प्रथम पुरस्कार प्राप्त हुआ।  सन १९७०  में उनका कविता संग्रह "अपने मन की जग- जीवन की "प्रकाशित हुआ। पंडित नरेंद्र शर्मा कहते हैं कविता व्यक्तित्व को अधिक व्यापक बनाती है| इसमें संयम ,संतुलन और सामंजस्य  पैदा करती है| प्रस्तुत संग्रह में कवि वसंत नाखरे  की भावी प्रगति को स्पष्ट करने वाली समाजपरक और उदात्त आयामी व्यक्ति वाली रचनाऍं भी शामिल हैं | कवि अधूरे गीतों की पूर्ति के लिये प्यार मॉंगता है ,कवि का स्वर उत्तरोत्तर निखरता हुआ प्रतीत होता है| समाजपरक दृष्टि लोक- हित के लिये कटाक्ष भी करती प्रतीत होती है| नंददुलारे वाजपेयी ने कविता पुस्तक को पाण्डुलिपि में देखा था,उनके अनुसार सहज अनुभूतियों का प्रसार इसमें प्रमुख रुप से दिखाई पडता है|इस कविता पुस्तक में कोई आव्हान नहीं है परन्तु जीवन के वैषम्यों की प्रतिक्रिया इसमें यत्र तत्र व्याप्त है | इस काव्य रचना में जीवन की समतल धारा के दर्शन होते हैं,तथा रचनाओं में प्रवाह है | उनके अनुसार कवि हिन्दी भाषी प्रदेश में रहते हुए भी मूलतः हिन्दी भाषी नहीं है अतएव इस रचना का विशेष रूप से स्वागत किया जाना चाहिए |
कवि को देश प्रेम, अंधविश्वास और कर्मकांड के खिलाफ आवाज उठाना आदि संस्कार अपने दादा नारायण बालकृष्ण नाखरे से प्राप्त हुए | दादाजी ने दामोदर मावलंकर से प्रभावित होकर ब्रह्म विद्या के प्रसार -प्रचार के लिए सन‌् १८९२ में सागर बुंदेलखंड में पहला छापखाना "आलकाट प्रेस "के नाम से स्थापित किया| इतना ही नहीं रूढिवादी मराठी ब्राह्मण समाज का तीखा विरोध सहकर भी उन्होंने अपनी बाल विधवा बहन का पुनर्विवाह संपन्न कराया था। स्वभाव से भावुक किंतु विचारों  से क्रांतिकारी कवि की कविता जब पूर्ण होती ,चाहे आधी रात हो अपनी दोनों छोटी बहनों को उठाकर  कविता सुनाते| बहनें भी ऑंखें मलती गर्व का अनुभव कर कविता सुनती |आगे चल कर जब छोटी बहन का विवाह होने वाला था ,तब वर पक्ष की ओर से "समधी -भोज" का महाराष्ट्रीय परंपरा के अनुसार आमंत्रण आया| तब उन्होंने कहा कि आप यह भोज न दें क्योंकि हम विवाह के बाद भी उनके घर जाकर भोजन करेंगे |
कवि वसंत बहुमुखी प्रतिभा के धनी होने के साथ ही हँसमुख प्रकृती के थे।  बैंक में नयी नौकरी लगी थी और गणेशोत्सव प्रारंभ हुआ तब नाटक ,कविता पाठ में उत्साह से भाग लेते थे।  एक दिन बैंक में थकान के कारण बेहोश हो गये ,तब एक घंटा आराम करने के बाद पुनः उन्होंने  काम  किया और रात में फिर से कार्यक्रम में नाटक प्रस्तुत किया।कवि सदा ही अपनी माटी से जुड़े रहे तथा मदद के  लिए हमेशा तत्पर रहते थे | मुंबई तबादला होने के बाद, जब कोई सागर से नौकरी हेतु साक्षात्कार देने आता, तब उसे अपने घर में ठहराते, मित्रों के साथ कपड़ों का इंतजाम करते , लाने - ले जाने की व्यवस्था करते थे | 
अगस्त १९७१ में जब अजित वाडेकर के नेतृत्व में भारतीय क्रिकेट दल ने आंग्ल(इंग्लिश) दल को उसी की धरती पर शिकस्त देकर  श्रृंखला  पर जीत अपने नाम की,तब भारत वापस आने पर उनका भव्य स्वागत हुआ |उस समय भारतीय स्टेट बैंक के अध्यक्ष श्री आर.के. तलवार जो कवि वसंत से बहुत  स्नेह रखते थे,उन्होंने अजित वाडेकर के साथ बैंक -जमा   निधी (संचय) को आकर्षित करने के लिए भारत - भ्रमण पर भेजा | जब एक महिने बाद वे वापस आए,तब थकान के कारण बीमार पड़ गये । चिकित्सक.ने कुछ जाँच  करने के बाद कर्क रोग  का निदान किया | उनका इलाज शुरू हुआ, उस समय उनकी छोटी बहन  शादी के १५ वर्ष बाद एम.ए. की परीक्षा दे रही थी,तब उन्होंने कहा कि जब ऐसा लगे कि मैं जीवित नहीं रहूंगा तभी उसे बुलाना ,अतः पहले उन्हें खबर नहीं दी गई लेकिन हालात विकट थे |बहन  सुदूर बस्तर जिले में थी, सबसे आखिर में मुंबई आयी और बहन  से  मिलने के दूसरे ही दिन उनका ४३ वर्ष की आयु में(३ मार्च १९७३)  असमय देहांत हो गया | कवि अपने जीवन की सीमित अवधी में अपनी कविताओं से लोगों के मन में  बस गया।  


१. जब कभी देखता हूँ

जब कभी देखता हूँ
मेहनतकश किसान के
श्रम के पसीने से सींचे हुए
दूर तक फैले इन
हरे भरे खेतों में

हवा के झोकों पर
 बलखाती बालियाँ
बांधे हैं जिनपर ही
भोलेभाले किसान ने
आने वाले कल के
सुनहले सपने सब 

एक प्रश्न उठता तब
आजकल बांधे हुए
कई बांधों की तरह
यह बांध भी ढह तो न जाएगा 

बनिये का ब्याज 
तकाबी की किस्त 
और धर्म के नाम 
कुछ देने के बाद 
उस झोपड़ी में इसका 
कितना कुछ जावेगा 

वो आने वाले कल के
सुनहले सपने सब
क्या कभी सच होगें?


 २. योजना का ब्याह 

देश की योजना सज रही सँवर रही
 दुल्हन के द्वार पर शहनाई बज रही
 दुल्हन के मन की अभी
 कुँवारी  सभी आशायें |
 सपनों का "रामराज्य "
दूल्हा बन आयेगा 
मदमाती बहारों को 
साथ में लायेगा 
प्यार के गीतों को
मस्ती से गायेगा
कण कण में नवजीवन
नवयौवन छायेगा |
    
मगर कल की किसे फिक्र 
यहाँ आज तो आज है 
दुल्हन के अंग अंग 
सज रहा साज है 
जो दूर थे सपनों से 
पराये भी अपने अब 
नाते और रिश्ते के 
सगे सभी सम्बंधी
 स्वार्थ की राह चल
आये सभी दूर से 
   
ब्याह की गड़बड़
धूमधाम चहल - पहल 
मैं -मैं और तू -तू का 
बाजार भी गर्म है 
मौसम भी खराब यह 
बहुत ही सर्द है 
तुमको कुछ दर्द है 
आज का नवीन युग
 कहता है देख लो 
इस में जो ताप ले 
वही तो मर्द है
   
चमक दमक सोने की 
भाखरा भिलाई से
 कितने ही गहनें यहाँ 
बन रहे गढ़ रहे 
कुछ दुल्हन की सजावट को
 कुछ ऊपर की दिखावट को
 ये कितने ही रिश्तेदार
 जतलाने अपना प्यार 
  आये जो ब्याह में
     
 कल तक जो गरीब थे 
 दीन मुहताज थे 
ब्याह की गड़बडी़
आज वो अमीर हैं
 बन गये मीर हैं
 कुछ लोग कहते हैं
 इसको तकदीर है 
कुछ एक कहते हैं
 यही तो मौका है
 लेकिन मैं कहता हूँ
 यह बहुत बडा धोखा है
      
विदेशी कर्ज पर
 यह ब्याह की धूमधाम
 और ये बाराती जो 
खोये हैं अपनों में
अपने ही सपनों में 
जाने कब टूटेगा 
अपनों का सपना यह 
दुल्हन का सच्चा अब
 शृंगार सब कब होगा
 जाने कब सपनों का 
"रामराज्य "दूल्हा बन
 सजधज कर दुल्हन
 के द्वार पर आयेगा?

 ३. बन्धन  मुक्त करेंगे माँ  को

बन्धन मुक्त करेंगे  माँ  को
धधक उठी अन्तर की ज्वाला| 
वह पहला स्वातंत्र्य युद्ध था 
नही गदर सत्तावन वाला ||

  करने  कुछ व्यापार यहाँ पर
   धीरे   धीरे   पैर   जमाये|
  और राज्य  विस्तार बढाने 
  नये फूट के बीज  उगाये || 

  हड़प नीति की ऐसी चालें
 हर दम चलता रहा दुरंगी |
 धीरे धीरे राज्य मिट चले 
जमा चला अधिकार फिरंगी||

 बनकर काल देश पर छाया
 था गोरा पर मन का काला |
 वह पहला स्वातंत्र्य युद्ध था 
 नहीं गदर सत्तावन वाला ||

लेकर अपना स्वार्थ सभी तब
दो बिल्ली से लड़ते रहते -
बनकर बंदर ,तभी फिरंगी
 वह निपटारा करते  रहते ||

अजब सहायक संधि चलाई
 और चली कितनी ही चालें
 ऐसे  में  ही  उसने  चाहा-
 झांसी पर अधिकार जमा लें||

 झांसी की रानी ने तब ही 
 लिया रूप रणचंडी वाला |
 वह पहला स्वातंत्र्य युद्ध था 
नहीं  गदर  सत्तावन  वाला ||

माँ की ममता में रंग ड़ाला 
तब कितनों ने अपना चोला |
लिख  देंगे  इतिहास  खून से
वह  बिठूर का  नाना  बोला ||

यहाँ विदेशी टिक न सकेंगे 
कर न सकेंगे अब मनमानें|
माँ की  चीखें  सुन सकते हैं
कब  आजादी  के  दीवाने ||

बोल उठा था तब घर घर में
 रोटी का हर एक निवाला |
वह पहला स्वातंत्र्य युद्ध था
 नहीं  गदर  सत्तावन  वाला ||

कुंवर- तात्या- मंगल- मैना 
और अजीम की अमर कहानी|
कंठ  कंठ  में  बोल  रही  है -
शाह   बहादुर  की  कुर्बानी ||

युगों  युगों तक  अमर  रहेगा 
यह  पावन  बलिदान तुम्हारा| 
स्वर्ण  अक्षरों  से  अंकित  है 
त्याग भरा इतिहास सुनहरा ||

जगा  दिया था  जनजीवन में 
स्वर  आजादी  का  मतवाला |
वह  पहला  स्वातंत्र्य युद्ध था 
नहीं  गदर  सत्तावन  वाला||

(मुंबई राज्य द्वारा आयोजित १८५७ शताब्दी समारोह के अवसर पर पुरस्कृत रचना)

४. मानवधर्म

तारे सबके, चन्दा सबका,
 सबका  आसमान  है  |
फिर क्यों धरती बॅंटी हुई  है,
 मानव  सभी  समान  है ||

अरे  बनाई  बोलो  किसने ,
देश- देश  की  सीमाऍं ?
पानी किसका ,पर्वत किसके
 किसने बाँटी सरितायें ?
प्राण एक है, वेश अलग हैं,
 किसका  चीन  जापान  है |
तोड़ चलो अब ये दीवारें,
 मानव  सभी  समान हैं||

पावस पतझर अलग नहीं है,
 अलग  नहीं  मधुमास  है |
मान लिया जो युगों - युगों  से,
 मन  का  केवल  भास  है |

कहीं  तिरंगा, कहीं  दुरंगा  ,
कैसे  सभी  निशान  हैं |
तोड़ चलो अब ये दीवारें ,
मानव  सभी  समान  हैं||

मुसलमान  की  यह  कुरान तो,
 हिन्दू  की  यह  रामायण |
समझ नहीं  पाये खुद को  ही,
 व्यर्थ  हुए  सब  पारायण|| 

मंदिर, मस्जिद  ,गिरजा  किसके,
 किसका  धर्म  महान  है |
 तोड़  चलो  अब  ये  दीवारें,
मानव  सभी  समान  हैं ||

राम  कहाँ है , श्याम  कहाँ है,
 और  कहाँ है   पैगम्बर  |
 छू  पाया  है  किसने  अब तक,
 बोलो  यह  नीला  अम्बर ||

 किसके  ईसा, किसके  मूसा,
  सब  ही  तो  इन्सान   हैं |
 सब धर्मों  में  देखा अब  तक,
 मानव - धर्म  महान  है ||

५. मौन तुम्हारा प्रिय मुस्काना

 मौन तुम्हारा प्रिय मुस्काना। 
 तुम चाहे जो इसको समझो,
 मुझे बना है एक अफसाना।।

उर  में  मेरे भाव जगाकर 
प्यार भरा ,भर दी अभिलाषा। 
 तुमने  ही तो  मुझे  सिखाया,
 पढ़ना नयनों की  यह भाषा।।

 गीत प्यार का जो था गाया  
 बना  मुझे  है  वही  तराना। 
मौन तुम्हारा प्रिय मुस्काना।।

 नित ही सपनों में प्रिय आकर
 मौन  सन्देशे  दे जाते  हो। 
 जीवन का यह तिमिर मिटाकर,
 नव  प्रभात तुम भर जाते  हो।।

 मन ही मन फिर सोचा करता। 
 सपनों को  साकार  बनाना 
मौन तुम्हारा प्रिय मुस्काना।।

६. हर  दिन  देखा

हर दिन देखा चढ़ता सूरज,
और  ढलती  सांझ  भी |
अरे क्षितिज पर आकर झुकता,
 ये  ऊँचा   आकाश  भी  ||

विकट‌ अरे यह काल -चक्र तो,
 चलता रहता  है  प्रति पल |
टिके रहेंगे बोलो कब  तक,
 ऊँचे - ऊँचे  बने  महल ||

 मिट्टी  में  मिलते  देखे  हैं  ,
 वो  दीवाने  खास  भी  |
हर दिन देखा चढ़ता सूरज, 

 जिनकी चलती तलवारों में ,
भरा हुआ था कितना बल |
 आज गाँव  की चौपालों में ,
रहे गये वो "आल्हा उदल " ||

बोल  रहा है युगों - युगों  से,
 आज  एक  इतिहास  भी  |
हर दिन देखा चढ़ता सूरज ,
और  ढलती  साँझ भी  ||

मिट्टी का तन मिट्टी में  ही , 
कभी एक दिन मिलना है|
 मैं  - मैं और यह  मेरा - मेरा,
अरे  एक  यह  छलना है ||

लेकिन मानव -मुख से फिर भी,
 नहीं  निकलता  काश  भी  |
हर दिन देखा चढ़ता सूरज ,
और  ढलती  साँझ   भी ||

 माया मदिरा की मस्ती में,
 दुनियाँ  मतवाली  बनती  |
अपना अपना है इक सपना,
 इन साँसो की क्या गिनती  ||

बांध  नहीं  पाये  प्राणों  को  ,
ये   साँसो   के  पाश  भी  |
हर दिन न देखा चढ़ता सूरज
और  कि  ढलती   साँझ   भी||

७. ओ  राही

राहत मिलती है मन को गाने से ओ  राही,
 इसलिये मीत मैं गीत हमेशा गाता हूँ  |
मैं भूल न जाऊँ जग के झूठे  वैभव में ,
इसलिये तार अन्तर के छेड़ा  करता हूँ ||

मत समझो केवल शब्दोंका यह  खेल अरे ,
 मन के कितने ही भाव मधुर अनमोल भरे|
 मन की चाहें मैं पास तुम्हारे ले आता  ,
उलझन की राहों पर चाहें सब बिखर गयीं||

 बिखरी चाहें सपनों में मिलती मन चाहीं ,
इसलिये स्वप्न को सदा साथ सुलाता रहता हूँ ||

कलियों ने  सिखलाया  है मुझको अब तक ,
काँटों में रहकर भी हरदम , हंसते रहना |
लेकिन पीड़ा का भार बहुत बोझिल  मन  पर  ,
मैं थक ना  जाऊँ   कहीं राह में  ही आकर ||
 
दुख में डूबा मन हलका तो हो जाता  है  
इसलिये नयन से नीर बहाता रहता हूँ  |

सन्ध्या को ढलता सूर्य प्रातः को मुस्काता ,
मैं चलता हूँ  - तूफान साथ  मेरे आता |
डरकर लंगर से नाव बंधी रहने दूँ क्यों  ? 
कभी किनारा चल कर पास  नहीं  आता ||

लहरों में लहराना ही तो जीवन है ,
 इसलिये नाव लहरों में खेता रहता हूँ  ||

भले किनारा दूर रहे मुझसे इतना 
छलने को तूफान छलेगा अब कितना |
मिटने का आनंद शमा क्या कह सकती ,
लेकिन पूछेगा कौन  पतंगे से जाकर||

 इस दुनिया के भी पार दूसरी दुनिया है ,
इसलिये क्षितिज के  पार कभी चल देता हूँ||

८. अन्तर में है ज्वार  निरंतर

 अन्तर  में  है  ज्वार निरंतर 
और  बरसती  हरदम आँखें
 छायी  रहती हैं जीवन  में 
 हर पल दुःख की काली बदली
 फटे चीथड़ों में तन लिपटा
 मगर काल भी इस से डरता
 कोई कहता इसे भिखारीन
 कोई कहता इसको पगली|
 सदा निराशा पास खडी़ है 
 बहुत करूण है इसकी गाथा
 सुख ने मानो जीवन से ही
 तोड लिया हो अपना नाता
 पथ पर कब से पड़ी हुई यह
 साथ लिये बोझिल-सा  जीवन
 हर पल साँसों को गिनती ये
 तन पर की हर हड्डी गिन लो
 और किसी चेहरे पर दो गड्ढे
 चाहे उनको आँखें कह लो
 लिये हाथ में  खाली  डिब्बा
 लाख दुवायें लुटा -लुटा कर 
 हर  जाने  वाले  राही  से 
 माँग रही  खाने  को  केवल 
 दो  रोटी  के  सूखे  टुकड़े  
 मगर नहीं  कोई  भी  सुनता
 अपने  ही  स्वर और ताल  पर
 मदमाती  -सी  मस्त  चाल  पर
 हर  जाने  वाले  राही  ने  
 माथे  पर  थोडी  सिकुड़न  ला
 फिर से अपनी राह पकड़ ली 
ओ  मस्ती  में  चलने  वाले 
सुख  वैभव  में  पलने  वाले 
 कष्ट  तुम्हें तो  होगा  लेकिन
 एक  नजर इसको भी देखो 
और जरा सोचो तो समझो
चाहो तो कुछ थोड़ा कह लो
उचित समझ कर अगर चाह हो
तो  थोड़ा  दुःख-दर्द  बाँट  लो
भेदभाव के बंधन तजकर 
और मनुज को मनुज समझ कर
अन्तर  की  ममता  को  लेकर
 बरसा  दो  आशा  की  बदली |

९. किस तरह भूलूँ 
     
किस तरह भूलूँ  तुम्हारे प्यार को
मीत तुम ऐसे  हृदय पर छा गये||
            
जब निशा की कालिमा में मग्न हो ,
बेखबर होकर यहाँ सब सो रहे, 
देखता तब नित्य तुम आलोक  को
स्वर्ण थाली में सजाकर ला रहे
भूल से भी रहा जो भटका कहीं
 प्राण तुम देने सहारा आ गये ||
         
नित्य अलियों की मचलती टोलियाँ 
कौन जाने अब कहाँ  को चल पडी, 
बाग की कलियाँ  सभी अब सूखती
मौन गलियों में उदासी भर चलीं
इस तरह जो भी चमन उजड़ा जहाँ  , 
तुम  मधुर  मधुमास बनकर  आ  गये  ||
     
नील नभ के ऑंसुओं ने बरसकर
नम कर दिया ऑंचल धरा का जब यहाँ  
सह सकी बिजली न इसको एक पल, 
प्यार  का  ऐसा  जहाँ  देखा  समा  
जब मचलकर कड़कती थीं बिजलियाँ 
तुम इन्द्रधनुषी रंग लेकर आ  गये  ||
        
रूप का देकर भुलावा छल लिया
तब कहाँ   इसमें न कोई अर्थ है
और उधों ने सन्देसा यह दिया
 रूप की पूजा अरे सब व्यर्थ है
 किन्तु  मधुबन आज तक है गूँजता   
गीत तुम ऐसे स्वरों में गा गये||
         
बन गयी कैसी कठिन थी भूमिका ,
धर्म की थी जब परीक्षा युद्ध  पर
सत्य के आगे टिकेगा क्या कोई?  
या गिरेगा  यह गगन ही टूटकर
सत्य का रथ रुक ना जाये मोह  से  
तुम स्वयं तब सारथी बन आ गये||

१०. वो आँधी  से आये

वो आँधी  से आये
औ  तूफ़ां से चले गये
उनके स्वागत में
भोली -भाली जनता ने  
कितनें तोरण बन्दनवार
द्वार सभी सजवाये
ऊँचे  -ऊँचे  मंच
सदा बनवाये
जिन पर भारी-भारी गद्दे
शुभ्र चादरें बिछवायी
माइक लगवाये
बिजली भी जलवायी
 कोमल स्वर से गाया गया
 वंदे  मातरम्
 कोमल फूलों में गुंथा हुआ हार
 गले से पहनाया
 करतल ध्वनि
 फिर कुछ मानपत्र भेट हुए
 तब मंत्री का मीठा मीठा -सा 
 आग्रह -भाषण शुरू हुआ
 भाषण में कुछ रटी रटाई - सी
 भाषा, कुछ देश विदेश की
कुछ धर्म कर्म की बातें
 बापू और विनोबा का
फिर नाम लिया साधा जीवन
 उच्च विचारों को अपनाओ
 राष्ट्र के नव निर्माण में
अपना हाथ बँटाओ 
 श्रमदान करो
धनदान करो
सभी कुछ बतलाया
फिर बड़ी - बड़ी 
कुछ नई - नई योजनाओं
 की आशा
 लम्बे -लम्बे  वादें
 बडे़ - बडे़ आदर्शों  को बता - जता
त्याग और ममता का
करुणा और समता का…
पाठ ऊँचे -ऊँचे  मंचों से
 नीचे बैठी भोली -भाली
 जनता को सिखलाकर चले गये
 जो कुछ गहरी बातें वे समझ
 नहीं पाये खुद ही
 वे भी सबको समझाकर चले गये 
वो ऑंधी से आये
औ तूफ़ां से चले गये। 

संकलन : सारिका भवाळकर 




Monday, January 22, 2024

रा. अ. काळेले

 रा. अ. काळेले
(२२ फेब्रुवारी १९०७- १२ जून १९८१)



रामचंद्र अनंत काळेले यांचा जन्म सेंधवा, जिल्हा खरगोन (म. प्र.) या गावी झाला. त्यांनी  बी.ए., एल्एल.बी., संस्कृत काव्यतीर्थ ह्या पदव्या मिळवून पोलीस अभियोजक (प्रॉसिक्यूटर) म्हणून नोकरी केली.  मूळ गाव जुन्नर परंतु नोकरीनिमित्त इंदूरला स्थायिक झाले. शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि चारित्र्यसंपन्न म्हणून नोकरीत त्यांचा दबदबा होता. ते  पोलिस खात्यात अधिकारी होते पण त्यांनी त्या रुक्ष खात्यात राहूनही आपले कविमन जपले होते. काळेले यांचे सारे आयुष्य मध्य प्रदेशात इंदौर येथे गेले.

काळेले यांच्या बाबतीत एक विशेष नोंद म्हणजे पुढे मराठी कवितेच्या प्रांतात नाव मिळविलेल्या या कवीला बालपणी नीट मराठी बोलताही येत नव्हते. वडिलांमुळे त्यांच्यावर इंग्रजीचाच प्रभाव होता. पुढे मात्र त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले. या भाषांवर अधिराज्य गाजवत त्यांनी इतकी उंची गाठली की इंदौर येथील त्या वेळचे राज्यकर्ते होळकर यांनी 'राजकवी' ह्या उपाधीने त्यांचा गौरव केला. 

रा. अ. काळेले हे नवकवींच्या मागच्या पिढीतले असूनही त्यांनी नवकवितेचे स्वागत केले व हे वळण आत्मसातही केले. त्यांची सुरुवातीची कविता गेय होती. त्यांना अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व लाभले होते. ते उत्तम काव्यगायन सादर करीत. अनेक कविसंमेलनांतून त्यांनी काव्यगायन केले. त्यांची उत्तरकालीन कविता मुक्तछंदात्मक होती. त्यांत दलितोद्धाराची तळमळ दिसते. संस्कृत भाषेचे आणि काव्याचे विलक्षण प्रेम होते. त्यातूनच ‘विक्रमोर्वशीय’ या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले. म.ना. अदवंत यांच्या मतानुसार कुसुमाग्रज, वा.रा.कांत, बा.भ.बोरकर, श्रीकृष्ण पोवळे आणि रा.अ.काळेले हे पाच कवी म्हणजे आधुनिक कविपंचक आहे. अरे अरे कळसा ही कविता 'बालभारती'त होती ही एक आणखी महत्त्वाची माहिती यूट्यूब वाहिनीमुळे मिळाली.

रा. अ. काळेले यांचे उत्तमोत्तम असे ७ कवितासंग्रह वाग्वसंत, ओळखीचे सूर, भावपूर्णा, वसंतागम, गीतनिर्वाण, हिमअंगार, रूपमती तसेच ' भा.रा.तांबे : एक अध्ययन ' 'नवकवितेचे एक तप -१९४५ ते ५७' आणि "नवे अलंकार' हे समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध आहेत. हे सर्व ग्रंथ १९३४ ते १९६४ या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत त्यांच्या अधिकांश ग्रंथांचे प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे आहेत.  
त्यांची उत्तरकालीन कविता मुक्तछंदात्मक होती. त्यात दलितोद्धाराची तळमळ दिसते. संस्कृत भाषा आणि काव्य यावर विलक्षण प्रेम होते. त्यातूनच ‘विक्रमोर्वशीय’ या संस्कृत काव्याचे मराठीत रूपांतर केले.
रा. अ. काळेले यांच्या 'वाग्वसंत’ (१९३४), ‘भावपूर्णा’ (१९४३), ‘ओळखीचे सूर’ (१९४१) या सुरुवातीच्या कविता संग्रहांतील कवितांवर भा.रा.तांबे आणि रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ‘वाग्वसंत’ या काव्य संग्रहातील मोठा भाग हा प्रणय, शृंगार, प्रेमविषयक कविता यांचा आहे. या संग्रहाला कविवर्य भा.रा. तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘रूपवती’ आणि महात्मा गांधींवरील ‘गीत निर्वाण’ ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. ‘हिमअंगार’ आणि ‘नवे अलंकार’ ही पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. ‘तांबे एक अध्ययन’ हा भा.रा.तांबे यांच्या कवितेचे मूल्यमापन करणारा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ महत्त्वाचा आहे. तांब्यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करून त्यांनी या काव्य संग्रहातील कविता सौंदर्यपूर्ण प्रतिमांच्या भाषेत मांडल्या. 

त्यांच्या हयातीत ते विशेष प्रसिद्धीला आले नव्हते. प्रसिद्धिपराङ्मुख स्वभाव हेच त्याचे कारण असणार. पण भवानीशंकर पंडित यांनी याविषयी वेगळे मत नोंदविलेले आहे. 
पंडित म्हणतात, "रा. अ. काळेले आणि वा. रा. कांत” हे दोघे कवी पुण्या-मुंबईच्या परिसरापासून दूर असल्यामुळे व स्वभावाने चळवळे नसल्यामुळे त्यांच्या कवितांचा गाजावाजा जरा उशिरा झाला. काहीही असो. काळेले यांचे सात कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असूनही महाराष्ट्रीय जनतेला ते फारसे परिचित नव्हते, हे खरे. हे दुर्दैव काळेले यांचे नव्हे, तर महाराष्ट्रातील काव्यरसिकांचे.
"सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ' ही काळेले यांची इथे दिलेली कविता स्वतःच खूप बोलकी आहे. त्यावर वेगळे काही सांगायची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. पण तरीही...! - दोन बहिणींची आई वारलेली आहे. धाकटीच्या अद्याप हे आकलनाबाहेरचे आहे. थोरलीला (पण तीही तशी वयाने छोटीच) धाकटी विचारत आहे, "आई कुठे गेली? ' शेवटी समर्पक असे काहीच सांगता न आल्याने थोरली तिला स्पर्शाच्या भाषेत उत्तर देते. छातीशी कवटाळते आणि तीही धाई धाई रडू लागते.
रा. अ. काळेले यांचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे चित्रकलेची आवड आणि उत्तमोत्तम चित्रांचा संग्रह.चित्रकार होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मित्रमंडळींनी त्यांची चित्रे फ्रेम करून आपापल्या घरात जपली. काही ब्रिटीश मित्रांनी ती परदेशीही नेली. पुठ्ठ्याची घरे बनविण्याचाही छंद त्यांनी जपला. देखण्या घरांच्या प्रतिकृती बनवण्यातला आगळा आनंद त्यांना मिळत असे. 

सुट्टीच्या दिवशी गावाबाहेर जाऊन जलरंगात निसर्गचित्रे रंगविण्याचा छंद आयुष्यभर जोपासला आणि तो छंद कवितेतही दिसून येतो.  निसर्गावर कविता लिहिताना ते त्याचे निर्जीव वर्णन करीत नाहीत. त्यात ते बाहेरील आपला निसर्ग व आतील आपला आनंदभाव यांच्यात सीमारेषा ठेवत नाहीत.
रा. अ. काळेले यांनी कवितेबरोबरच काव्यसमीक्षाही लिहिली. साहित्यप्रेमाचा वारसा त्यांना वडील अ. सी. काळेले यांच्याकडून मिळाला. काळेले यांचा कल संस्कृत वाङ्मयाच्या अध्ययनाकडे अधिक होता. काव्यतीर्थ ही त्या क्षेत्रातील पदवीही त्यांनी मिळविली होती. काळेले यांचे महत्त्वाचे समीक्षाग्रंथ म्हणजे  "नवे अलंकार', "तांबे : एक अध्ययन' (भा. रा. तांबे यांच्या कवितांवरील), "नवकवितेचे एक तप : १९४५ ते १९५७' हे आहेत. 
समीक्षा लिहिल्यात तरी आतले अस्सल  कवीमन जीवंत राहिले. दलित किंवा खालच्या वर्गातील कष्टकरीचें श्रम बघून  त्यांना मनस्वी त्रास होत असे.

काळेले यांच्या कवितेने खऱ्या अर्थाने कूस बदलली ती १९४५ नंतर. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगायची तर प्रयोगशीलता, गेयता, प्रासादिकता. संस्कृत अभिजात काव्याचा त्यांचा मोठाच व्यासंग असल्याने साहजिकच विविध वैशिष्ट्यांनी त्यांची कविता नटलेली आढळते. काळेले यांनी वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर १९४५ नंतरच आपल्या कवितांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू केला. "रूपमती' आणि "हिमअंगार' या काव्यसंग्रहांत त्याची प्रचीती येते.
रा. अ. काळेले यांना जशी माणसाबद्दल आपुलकी होती तशीच किंबहुना थोडी अधिक प्राण्यांविषयी होती.१९५४ साली म्हैसूरच्या  चामराजेंद्र बागेतील प्राणी संग्रहालयासाठी पकडून ठेवलेल्या एका सर्पाने स्वतःच्या मुक्ततेसाठी अन्नत्याग आरंभल्याचे वर्तमान प्रसिद्ध झालें होतें. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षां सर्प हा वश होऊन राहण्यास अधिक नाखुषी दाखवितो असें तज्ञांचे मत आहे.त्या प्रसंगावरही त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी कविता लिहिली .
काळेले यांनी काही छोट्या कविता लिहिल्या आहेत.ते त्यांना ''मुक्ता'' म्हणतात आणि आजकाल बहुतेक कणिका म्हटले जाते. 

नागपूरच्या डॉ. आशा सावदेकर यांना कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांवर संशोधन करण्यासाठी युजीसी फेलोशिप मिळाली होती. तांब्यांवर आधिकारिक समीक्षाग्रंथ लिहिणाऱ्या काळेल्यांना भेटण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना मिळालेला अनुभव एका लेखात असा व्यक्त केला आहे :
" युजीसीकडे सादर करण्यासाठी त्या त्या गावी गेल्याचे सर्टिफिकेट लेखकांडून घ्यावे लागे .इंदोरला रा. अ. काळेले यांच्याकडे गेले तेव्हा आम्ही सामान धर्मशाळेत ठेवले होते आणि कडेवर पाच महिन्यांची मुलगी होती. काळेल्यांनी दार उघडले, खूप वेळ ते माझ्या चेहर्‍याकडे पाहात राहिले,मग जेव्हा त्यांच्या पत्नी प्रतिभाताई म्हणाल्या की, ‘त्यांना आत तर येऊ द्या’ तेव्हा ते भानावर आले. मला म्हणाले, ‘‘मला माफ करा. माझी निवर्तलेली मुलगीच तुमच्यात मी पाहिली.’’आत येताच ते सावदेकरांना म्हणाले, ‘‘तुमच्याजवळ सामान कसे नाही?’’ आम्ही त्यांना धर्मशाळेचे नाव सांगितले तेव्हा त्यांनी ऑटोवाल्याला हाक मारून ‘‘तिथे जा आणि सामान आणा’’ असे माझ्या नवर्‍याला सांगितले. माझ्या मुलीला कडेवर घेऊन सगळे घर दाखवत ते म्हणाले, ‘‘आमचे घर मोठे आहे. फक्त माझ्या मुलीची मुलगी इथे आहे.’’ त्या घराने मला माहेरच दिले. त्यांनी मला खूप माहिती दिली.दोन दिवसांचा मुक्काम करायला लावला. उज्जैन, देवास इथले पत्ते देऊन कुणाकुणाच्या भेटी घ्यायच्या ते सांगितले. परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा माहेरवाशिणीसारखे हातावर दहीही घातले."

अशा ह्या सर्वार्थाने राजसी कवीचा दुर्दैवाने एकही काव्य संग्रह हाती लागला नाही.तसेच त्यांचे छायाचित्रही उपलब्ध नाही. 


 १. आई कुठे गेली? 


“ सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ।

काल तिला तर उठवत नव्हते ।

म्हणती ती खिळली शेजेतें ।

आज सकाळी उठुनी पाहते । गेली तो आई ।

सांग ना ताई! ।।१।।


तू नि मीच ना इथली सारी ।

खिडक्या-दारे नीट लावली ।

वाट कशी मग तिला मिळाली ।

जावी कशी बाई ।

सांग ना ताई! ।।२।।


आजकाल मी हट्ट न केला ।

रडले नाही ठाउक तुजला ।

तिने बरोबर मग का मजला ।

घेतले नाही ।

सांग ना ताई ।।३।।


आई कुठे गेली असताना ।

उगी करावी तूच मला ना ।

आईसाठी तूच मग पुन्हा ।

रडसी कां ही?

सांग ना ताई ।।४।।


बाहुली माझी तूच फोडिली ।

चिमणी माझी तूंच हरविली ।

अगे लबाडे तूच लपविली ।

कुठे तरी आई ।

सांग ना ताई ।।५।।


बरें बरें जरी खाऊ न दिला ।

घेइ ताई जरी गोड गोडुला ।

पापा माझ्या दोन्हीकडला ।

दावी परी आई ।

सांग ना ताई ।।६।।


कवटाळुनी छकुलीला पोटीं ।

किती शहाणी ताई मोठी ।

होउनी छकुली वेडी धाकटी

रडली धाई ।। ७।।




२. नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 



नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !

तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला

अगे भक्तिसोपान सोपा भला

दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें

मराठी स्वराज्या असे स्थापिलें

अशी धन्य तूं वीरधात्री खरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


तुझी माधुरी मोदमात्रावहा

फुलांनी, मुलांनी खुले गे अहा !

कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी !

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 


तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा

नमो कृष्ण-रामा नमो भास्करा

तुझे लाडके हे धरावे शिरीं

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 



३. अरे अरे कळसा ! 


अरे अरे कळसा 

हसून नको पाहू 

पायरीचा मी दगड 

तुझाच की भाऊ 


मी तर बडा कळस 

माझा किरीट झळझळीत 

पायरीचा तू दगड 

पडलास धूळ गिळीत 


अरे अरे कळसा 

जरा बघ जरा तरी 

पायरीचा मी दगड 

तुझा भाऊ गरीब जरी 


मी उंच कळस 

चढणार आकाशी 

पायरीचा तू दगड 

पडणार तळाशी 


अरे अरे कळसा 

नको गाल फुगवून बसू 

पायरीचा मी दगड 

तरी भाऊ भाऊ असू 


डौलदार मी कळस 

माझा मुकुट कसा छान 

पायरीचा तू दगड 

तुझा पैजारांचा मान 


अरे अरे कळसा 

नको झिडकारू मला 

भाऊ ना मी तुझा 

माझा दादा तू भला 


कुठे मी कळस 

मला ठेंगणे आभाळ 

पायरीचा तू दगड 

आपली पायरी सांभाळ 


कळसाचा दगड 

गर्वाने चढला 

पायरीचा दगड 

मान घालून बसला 


इतक्यात आला सज्जन 

देवदर्शन करीत 

पायरीवर बसला 

‘राम राम’ करीत 


तितक्यात आला कावळा 

पंख फडकावीत 

जाऊन बसला कळसावर 

काव काव करत



४.हे जुने जोडे 


हे जुने जोडे !

कैक दिवस यांना घातले 

आता मात्र 

हे नाही ऐकणार 

नाही राहणार 

जाणार जाणार

मोकळे होणार 


गेलीच ही टाच 

बन्दांनी बंधन दिले झुगारून 

तोंड उघडून ही शिवण 

काही करी गुप्तभेद 

खालून खिळ्यांचे 

चावती दात 

त्यांना आली चीड 


या जोड्यांनी आता 

पुकारली आहे 

असहकारिता 


यांच्या मेलेल्या कातड्यालासुद्धा 

झाली आहे का 

निराळी जाणीव ?



५.थेंब आषाढाचे आले 


थेंब आषाढाचे आले 

जग जीवनाने न्हाले 

उन्मळले सप्तरंग 

उचंबळे अंतरंग 

आले चैतन्य भरून 

शिडशडले वरून 

वर्षे जीवन निष्पंद 

स्फुरे प्राणपरिस्पंद 

जग संजीवन प्याले 

थेंब आषाढाचे आले 


आले जीवरसायन 

झाले बीज रुजवण 

कणाकणात सकळा 

उताटली जीवकळा 

काळा कातळ फोडून 

आले फुटोनिया तृण 

जीवसत्व भरा आले 

थेंब आषाढाचे आले 


फुटे फांदीला धुमार 

आला वेलीला उभार 

पानो पानी रंग आला 

आला कळ्यांना उमाळा 

आशा तरारली जरा 

नवी उमेद ये भरा 

जीव जीवनाने धाले 

थेंब आषाढाचे आले



६. अमुचे तुमचे 


अमुचे नभ कृष्ण, निळे तुमचे 

तुमचे मधु, कंटक हे अमुचे 

तुमचे रिझणे, निजणे शयनी 

झिजणे, भिजणे, थिजणे अमुचे 


जगभार शिरीं, वळ पाठीवरी 

क्रमणे पथ दूक्रम दूरवरी 

तनु रेटित रेटित जात असे 

चढणे चढणीवर हे अमुचे 


अमुचे श्रमबिंदु, अपेश भले 

अमुचे भररक्तहि घाव खुले 

भरपोट मुखी नच घास जरी 

तरी पोटभरी हसणे अमुचे 


नयने निज झाकून अश्रुमुचे 

पडले तिमिरात  निमुट वचे 

नच ज्यास कुणी म्हटले अमुचे 

जन ते अमुचे, धन ते अमुचे



७. मोलकरणीचा पोर 


मोलकरणीचा पोर हा बिचारा 

त्यास बाजूला सापडे निवारा 

जिथे भांडी घाशीत बसे माय 

तिथे त्याने ताणून दिले पाय 


शैशवांतील वाळकी श्यामकांत 

हंत, उघडी क्षुत्क्षुण्ण तनू क्लांत 

अहो अंमळ आडवा जों न झाला 

तोच बाबा! लागला घोरण्याला 


गैरसोयीच्या कोपऱ्यांत तेथे 

सर्व सोयी आराम त्यास भेटे 

क्लेश आणी आयास दिनभराचे 

तेच निद्रासुख त्यास देति साचें 


नाद भांड्यांचा होई घासतांना 

त्यास अंगाई गीत तेंच माना 

चिऱ्यावरतीं टेकली असे डोई 

तोच त्याला मऊमऊ अशी होई 


भुईवर हो पडला खडबडीत 

नरम गादी ती होय गुबगुबीत 

रातवाऱ्याचा शीतळ जो चाळा 

तोच कुरवाळा होय तया बाळा 


जिथे मानव पुरवी न दया छाया 

तिथे पाखर करि मृदु निसर्गमाया 

क्षुद्र चिंता हो क्षुद्र मानवाची 

धन्य करुणा महनीय निसर्गाची !


– रा.अ.काळेले


८. हळूच माझ्या खिडकीतून 


हळूंच माझ्या खिडकींतुन हे चान्दकिरण ठाकले 

उशालगत हे आले केंव्हा आणि कसे, नाकळे 


धवलचारुता ही रसरसती सरतीसरती पुढे 

बघून हिची चोरटी चातुरी विस्मय चित्तीं पडे 


हळूंच शिरली, हळूंच शिवली, हळूंच पडली गळीं, 

अभिसाराची कला अशीही कुणी बरे शिकवली ?


प्रथम दूर, नन्तरी निकट, मग चिकटलींच कीं मला 

खान्द्यावर, गाली मग ओंठी कले गौरकोमला 


किन्चित माझ्या उशीस शिवली या किरणांची खुशी 

त्या स्पर्शानें जड शय्याही पहाच हसली कशी !


या खिडकींतुन शुभ्र छबीचा चौकोन असा पडे 

कीं नवलाचें प्रेमपत्र हे उघडे माझ्या पुढे 


रजतपटावर रजतरसानें लिही रजत कामिनी 

रजतलेख तो वाचून झालों दंगच अपुल्या मनी 


हळूंच माझ्या खिडकींतुन कां चान्दकिरण ठाकले?

काय चान्दण्याचा कागद हा पोंचविण्या पातले?


– रा.अ.काळेले


९. मला सोडा-मला सोडा 


मला सोडा-मला सोडा !

कसा बंधनात राहूं ? 

खुल्या वाऱ्याचा पिपासू 

कसे कोण्डलेलें खाऊं ? 


बन्दिवान राहायला 

कसा- कसा होऊं राजी ? 

पिन्जऱ्यांत नान्दणारी 

जात नव्हे नव्हे माझी !


मला सोडा - मला सोडा 

कसा होणार मी वश ? 

रुसेल ना नागकन्या ? 

फणा हापटील शेष 


माझ्या फणेवर आहे 

स्वातंत्र्याचा तेजोमणी 

त्याला बन्धन पडतां 

जाय झिजोनी विझोनी 


उच्छृंखळ सुटेपण 

माझ्या कण्यांत कण्यांत

वृत्ती नाचरी नाचरी 

माझ्या कणांत कणांत 


माझ्या नितळ तनूचा 

आहे केतकीचा झोक 

चन्दनाच्या बनोबनीं 

माझा अधीरला रोख 


माझी बाकदार चाल 

आहे रानाच्या झऱ्याची 

माझी स्वच्छन्दी लहर 

आहे सैराट वाऱ्याची 


माझा गहिरा सुरंग 

त्याला संगीताची धुन्द 

माझ्या कुरळ्या कुरळ्या 

आवडीचा मुक्तच्छंद 


माझे झरकन् रिघणे 

आहे तुटल्याताऱ्याचें 

माझे सर्रकन निघणें 

आहे चपळ पाऱ्याचें


माझी सरारी तीराची 

तिला पाताळाचीं टोकें 

माझी वाट उजळती 

लक्ष हीरकमाणकें 


माझा वेढता विळखा 

घट्ट प्रेमाची पकड 

माझ्या जहरी निशेला 

गाढ तारुण्याचा चढ 


माझा बासरीचा श्वास 

माझी गरुडाशीं झुन्ज 

माझ्या रागीट फूत्कारीं 

उभे ठिणग्यांचें कुन्ज 


दर्प हिरव्या चाफ्याचा 

माझ्या उभार फणेंत 

तिच्या उगारीं राहती 

खड्ग गदा समवेत 


माझे विजेचें स्फुरण 

माझी प्रकाशाची उडी 

मला सोडा-मला सोडा 

माझी तुफान तातडी 


मला सोडा-मला सोडा 

जीव कोण्डला अन्तरीं 

मला सोडा-मला सोडा 

प्राण सोडीन ना तरी !


(म्हैसूरच्या  चामराजेंद्र बागेंतील प्राणी संग्रहालयासाठी पकडून ठेवलेल्या एका सर्पाने स्वतःच्या मुक्ततेसाठी अन्नत्याग आरंभल्याचे वर्तमान प्रसिद्ध झालें होतें. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षां सर्प हा वश होऊन राहण्यास अधिक नाखुषी दाखवितो असें तज्ञांचे मत आहे.)


सन १९५४


या काही ह्या काही छोट्या कविता आहेत त्यांना राजकवी काळेले  यांनी मुक्ता हे नाव दिलेले आहे. आता त्यांना बहुतेक कणिका असं म्हणतात तर वाचूया काही मुक्ता 


१. 

कळिस दिले तूं पूर्तीचे कैवल्य 

त्वत् स्पर्शाची वोपुनि तिजला स्फूर्ती 

तूंच रविकरा आतां चढल्यावरतीं 

त्याच फुलाचें करिसी का निर्माल्य ? 


२.

त्या ऐन्यानें तुज समोर क्षण एक 

झळकविली तव मधुरमुखप्रतिमा गे 

मात्र धुळीनें जपुन ठेवले मागें 

तूं गेल्यावर तवचरणांचे अंक! 


३.


पिळून चान्दणें घडली तव तनु गोरी 

नयन निर्मिले पिळून हिरे नवकोट 

माणिक पिळुनी तुझे बनविले ओठ 

पिळून मनें गे बने हर्ष तव पोरी 


४.

दिनरजनीचा सारीपट नभिं चाले 

कीं बसला हो लेखक कोणि निनांव 

पसरून आभाळाचा कोरा ताव 

करीतसे जो पांढऱ्यावरी काळें ?  


५.

हे धरतीचे झरते हृदयउमाळें 

कुठुन  बरें हे वाहत येथें आले ?

कुठुन तरी हे असेच वाहत आले 

वाहत वाहत तीर्थ जगाचे झाले! 


६.

जुळविलीच त्यानें कविता काही नवी 

ते कवित्व मग तो पत्नीला दाखवी

"समजलिस् काय तूं ? साधा का मी कवी ?" 

ती निर्विकार चेहरा करून बोलली 

"राहूं द्या कणिका ! कणीक आधी हवी" 


७.

रसज्ञ भ्रमर, मम मधुरस तुज ठावा 

मम सुरंगनी सुगन्ध तुजला व्हावा 

तुज रसिका रे कोठून कीट दिसावा ? 

मज पोखरुनी आंत घेई जो चावा!


संकलन : अलकनंदा साने 




    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...